
केज :-शहरातील कानडी रोड भागातील एका तरुण-तरुणीच्या वैयक्तिक निर्णयाला राजकीय स्वार्थापोटी ‘लव जिहाद’ आणि जबरदस्तीने धर्मांतराचा रंग देऊन शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा रचलेला कट अखेर पूर्णपणे उघडकीस आला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही जहालवादी घटकांनी आणि मोर्चाच्या आयोजकांनी केजमध्ये जातीय अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते हारूनभाई इनामदार यांची तत्परता आणि केजच्या सुजाण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा बनाव उघडा पडला आहे.
नेमकी घटना काय?
केज शहरातील कानाडी रोड भागात राहणाऱ्या वंजारी समाजातील एका १८ वर्षांवरील सज्ञान तरुणीचे आणि बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या २० वर्षीय शेख आडनावाच्या तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. ही गोष्ट कुटुंबियांना आणि स्थानिकांना समजल्यानंतर हे प्रकरण केज पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.
यावेळी कोणताही अनर्थ घडू नये आणि प्रकरण शांततेत सुटावे म्हणून:
पोलीस निरीक्षक सुर्यतळ साहेब
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हारूणभाई इनामदार
मुलीचे व मुलाचे पालक
यांच्या उपस्थितीत तब्बल १० तास पोलीस ठाण्यात समुपदेशनाची बैठक पार पडली. “भविष्यात एकत्र राहणे कठीण जाईल,” असे मुलीला समजावून सांगण्यात आले. मात्र, “आम्ही सज्ञान आहोत, कायद्यानुसार स्वतःच्या मर्जीने लग्न केले आहे,” अशी भूमिका घेत या जोडप्याने आपला निर्णय ठाम ठेवला आणि ते मुंबईला निघून गेले.
राजकीय स्वार्थासाठी ‘लव जिहाद’चा फुगा
हे प्रकरण समोपचाराने संपलेले असतानाही, काही स्वार्थी आणि जहालवादी घटकांनी या घटनेला जबरदस्तीने ‘लव जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ असे चुकीचे व भडकाऊ वळण दिले. दोन समाजात वैमनस्य पसरवण्यासाठी बाहेरून वक्त्यांना बोलावून ‘आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले.
हारूनभाई इनामदार यांचा पुढाकार आणि मुलीचा प्रत्यक्ष खुलासा
केज शहरात पुन्हा धार्मिक तणाव निर्माण होऊ नये आणि काही वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हारूनभाई इनामदार यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी अशोक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एक टीम मुंबईला पाठवली.
या टीमने दोन-तीन दिवस अहोरात्र प्रयत्न करून कुर्ला (मुंबई) येथून या जोडप्याचा शोध घेतला आणि त्यांना केजमध्ये परत आणले. २९ जुलै २०२६ च्या मध्यरात्री तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मुलीचा थेट जबाब:
पत्रकारांशी बोलताना मुलीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्ही आमच्या स्वखुशीने आणि मर्जीने लग्न केले आहे. या प्रकरणात कोणताही लव जिहाद किंवा जबरदस्तीने धर्मांतराचा प्रकार झालेला नाही.”



