सामाजिक
आळंदीतील प्रेमविवाहांचा धक्कादायक ट्रेंड; पळून जाऊन लग्न अन् नंतर घटस्फोट
पळुन जाऊन लग्न केलेले तरुण तरुणी दोन वर्षात वेठबिगारी करत दिसतात...!

आळंदी येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी ७०% जोडपी घटस्फोट घेत असल्याचं समोर आलं आहे
वयाचा फायदा घेऊन जिवनभरचा मागचा पुढचा विचार न करता चैनसुखाचे आश्वासनावर आळंदी येथे पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी ७०% जोडपी दिलेले आश्वासन न पाळण्यामुळे घटस्फोट घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सोलापूरच्या एका जोडप्याने सहा-सात वर्षे प्रेमसंबंधानंतर लग्न केले, पण लग्नाच्या रात्रीच मुलीने लग्न तोडण्याचा निर्णय घेतला, हे याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
अनेक जोडपी घरच्यांना न सांगता आळंदीत पळून जाऊन लग्न करतात. झटपट लग्न लावून देणारी बेकायदेशीर यंत्रणा आळंदीमध्ये कार्यरत आहे. मात्र असा प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याचं समोर आलं आहे.
प्रेमविवाह फसण्याची कारणंः
प्रेमविवाह फसण्यामागची कारणे मुलाची आश्वासन न पाळणे दारु पिऊन पत्नीला मारझोड रात्री उशीरा घरी येणे दोन्ही कुटुंबातील सामाजिक, आर्थिक, आणि परंपरांमधील तफावत, मुले झाल्यावर येणारी जबाबदारी कडे दूरलक्ष या गोष्टी कारणीभूत आहेत.



