संपादकीय

पालकमंत्री व वाल्मीक आन्ना कराड यांच्या पूढे प्रशासन हतबल

वाल्मीक आन्नाच्या हस्तपेक्षामूळे ग्रामसेवक ते जिल्हाधिकारी परेशान

बीड:- लोकसभेच्या निवडणूका नूकत्याच पार पडल्या अटीतटीच्या लढतीत बजरंग बप्पा सोनवने चा विजय झाला अन थोडक्या मताने पंकजाताईचा पराभव झाला पन हा पराभव ताईच्या अत्यंत जिव्हारी लागला त्यांचे पडसाद थांबायचे नाव घेत नाहीत त्यामधे राजकीय,सामाजिक, जातीय, आरोप प्रत्यारोप अजुन चालूच आहेत गेल्या वेळेस बजरंग बप्पा पराभूत झाले त्यावेळी त्यांनी किंवा त्यांच्या जातीने   आगपाखड केली नाही किंवा पराभव जिव्हारी लागला नाही आता कशी जात कशी  आडवी आली  मग यावेळी जातीवाद फोफावला कसा  यासाठी एकच जवाबदार आहे तो कोण  तर एकच नाव आहे  पालकमंत्री   जातीपातीला खतपाणी घालणारे  आज मराठा समाजाला टार्गेट केले जात आहे सत्तेसाठी किती खालच्या थराला जाऊन गून्हे दाखल केले जात आहेत

मराठा समाजाने आज पर्यत मूंडे साहेब गायकवाड साहेब प्रितमताई यांना मतदान केले नाही का हे आज पर्यतचे सर्व खासदाराना मराठा समाजाने भरपुर प्रमाणात मतदान केले तरी आज मराठा आरक्षण देवेंद्र फडणविस ची मराठा समाजाविषयी धोकेबाज प्रवृती यामुळे भाजप विरोधी लाट होती यामधे पंकजाताईचा १००% दोष नाही मग मराठा समाजाचा दोष काढण्यात काही गून्हेगार अग्रेसर आहेत त्यामधे  मागे पंकजाताई म्हणल्या प्रमाणे पालकमंत्री पद  विकले आहे त्या प्रमाणे हा अती तेथे माती असे  झाले आहे पण या मधे निरागस ताईचा बळी गेला हे खात्रीपूर्वक  बळी गेला अन या उपर  आज बीड मधे जातीयवाद टोकाला पोहचला आहे याला फक्त पालकमंत्रीच जवाबदार आहेत  यामधे गोरगरीब युवकाचे आयूष्य बरबाद होत आहे काहीनी तर ताईचा पराभवच मान्य होत नाही त्यामळे आत्महत्या केलेल्या आहेत तर बरेच यूवकानी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत हे कूठेतरी थांबले पाहीजे
विजयी झालेले बजरंग बप्पा सोनवणे हे दोन कारखाने चेअरमन पन आहेत जिल्हा परीषदचे दोन वेळा शिक्षण सभापती पद पत्नी जिल्हापरीषद सदस्य होत्या राज कट्रंशन नावाची मोठी कंपनी आहे करोडे रुपयेचा त्यांचा कारभार आहे तरी शेतकरी पूत्र गरीब कूटूंबातील व्यक्ती म्हणूनच ब्रदावली म्हणून नाव लावतात हा राजकीय भाग आसला तरी वस्तुस्थिती वेगळीच आसते आता उद्दोगपती किंवा कारखानदार झाला आहात त्यामूळे यांचा पराभव किंवा विजय झाला या मधे तूम्हाला काही फरक पडणार नाही फरक पडतो तो सर्व सामान्य जनतेला
त्या उलट पंकजाताई या आदरनीय  गोपिनाथराव मूंडे यांच्या कन्या  त्यांचे वडील  विरोधी  पक्ष नेते उपमूख्यमंत्री ग्रहमंत्री खासदार केंद्रीय मंत्री व साहेबाच्या कन्या दोन तीन वेळा आमदार पालकमंत्री त्यांची लहान बहीन १० वर्ष खासदार अनेक करोडो रुपयेच्या विविध कंपन्या चूलत भाऊ आमदार विरोधी पक्ष नेते मंत्री पालकमंत्री या मागास घरात फक्त पंतप्रधान  पद मिळाले नाही हे बीड जिल्ह्याचे दूरभाग्य   असे  आज पर्यत असे विविध  पदे भूषवलेले कूटुंब मग मागास जातीत जन्म घेतला हे आमचे  पाप आमच्या नसिबी आले हे उद्गार धनंजय मूंडे साहेबाचे सर्व सामान्य मागास जनतेला पन तूमच्या सारखे थोडे तरी पाप आमच्या नसिबी यावे ही कामाना करूयात

आज बीड जिल्ह्यातील सर्व समाजातील जनतेला आवाहन करू ईच्छतो की हे राजकीय मंडळी राजकीय फायद्यासाठी गोरगरीब जनतेचा बळी घेत आहेत त्यामूळे यांच्या मूळे कोणी आत्महत्या किंवा खालच्या थराला जाऊन बदनामी करू नका हे पराभूत झालेले किंवा विजयी झालेले उमेदवार कूठे रोजादंरीवर कामावर दिसणार नाहीत हे विमान हेलीकॉप्टर,मधूनच फिरणार आहेत

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button