सामाजिक

आई-वडिलांना झोडपणारे अन् बायको-मुलांना वाऱ्यावर सोडणारे… केजमध्ये दंगल घडवायला ‘हेच’ मोहरे पुढे!

भवानी चौकातील वाद की जातीय दंगलीची रंगीत तालीम? कौटुंबिक नीतिमत्ता गमावलेल्या तरुणांचा राजकीय अन् जातीय स्वार्थासाठी बळी!

केज :-केज नगरपंचायत आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केज शहरात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटकांकडून सुरू असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. भवानी चौकात दोन युवकांमध्ये झालेल्या निव्वळ वैयक्तिक भांडणाला जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम असा रंग देऊन शहराची शांतता धोक्यात आणण्याचा कट रचला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
‘हिंदू खतरे मे है’चा बनाव अन् बंदची हाक
अशा प्रकारची कोणतीही वैयक्तिक भांडणे किंवा किरकोळ वाद झाले की तात्काळ “हिंदू खतरे मे है” असा चुकीचा आणि भडकाऊ प्रचार करून केज शहर बंदची हाक देण्यात येते. निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय व जातीय स्वार्थापोटी नागरिकांच्या भावना भडकावून, भीतीचे वातावरण तयार करणे आणि शहराचा सामाजिक सलोखा बिघडवणे हाच या बंदमागील मुख्य हेतू असल्याचे उघड होत आहे.
कौटुंबिक नाती नाकारणाऱ्या ‘ब्रेनवॉश’ तरुणांचा वापर
जातीयवादी किंवा धार्मिक कट्टरतावादी संघटना, मग ती कोणत्याही धर्माची असो, विशिष्ट प्रवृत्तीच्या तरुणांचे पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉश’ करत असल्याचे समोर येत आहे. ज्या तरुणांचा आपल्या आई-वडिलांशी कसलाही आदरयुक्त संबंध उरलेला नाही, जे घरात आई-वडिलांशी किंवा बायको-मुलांशी वाद घालतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून पळ काढतात, अशा दिशाहीन तरुणांचा शोध घेऊन त्यांना या जाळ्यात ओढले जाते.
कुटुंब, प्रपंच, आई-वडिलांचे छत्र आणि बायको-मुलांचे भविष्य या सर्व गोष्टींचा या तरुणांच्या डोक्यातील जातीयवादी विचारांमध्ये अडसर ठरतो, म्हणूनच त्यांना कौटुंबिक मायेपासून पूर्णपणे दूर ढकलले जाते. ज्या व्यक्तीला स्वतःच्या जन्मादात्या आई-वडिलांची आणि पोटच्या लेकरांची कदर उरलेली नाही, ती व्यक्ती समाजाची किंवा स्वतःच्या धर्माची कधीही निष्ठावंत होऊ शकत नाही.
शांतताप्रिय नागरिकांचा संतापजनक सवाल
जे तरुण स्वतःच्या आई-वडिलांचे, बायकोचे आणि मुलांचे झाले नाहीत, ते हिंदू किंवा मुस्लिम धर्माचे काय होणार? असा रोखठोक सवाल आता सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे. क्षुल्लक वैयक्तिक वादांचे भांडवल करून शहर बंद पाडणाऱ्या आणि शांतता धोक्यात आणणाऱ्या या भडकाऊ प्रवृत्तींना पाठीशी घालणाऱ्या घटकांचा बुरखा आता फाटला आहे.
नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना, चिथावणीखोर कारवायांना किंवा नाहक बंदच्या हाकेला बळी न पडता केज शहरात शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन सूज्ञ नागरिकांमधून केले जात आहे.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button