Uncategorized

अन्न भेसळीविरोधात तुकाराम मुंडेंचा ‘कायदेशीर दणका’; बदलीच्या चर्चेने जनता सतर्क, सोशल मीडियावर मोहीम सुरू!

खबरदार, जर मुंडेंची बदली केली तर...! अन्न माफियांच्या दबावापुढे सरकार झुकणार का? जनतेचा संतप्त सवाल!

मुंबई:-महाराष्ट्रात सध्या अन्न भेसळीच्या विरोधात सुरू असलेल्या धडाकेबाज कारवायांची जोरदार चर्चा रंगली आहे. हॉटेल, ढाबे, आईस्क्रीम विक्रेते, किराणा दुकानदार ते अगदी मोठमोठ्या अन्नपदार्थ उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत. या अचानक सुरू झालेल्या वादळी कारवायांच्या मागे नक्की कोण आहे, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर त्याचे एकच उत्तर आहे— आयएएस (IAS) तुकाराम मुंडे!
तुकाराम मुंडे यांनी ज्या विभागाचा पदभार स्वीकारला, तिथे कायद्याचे काटेकोर राज्य आणणे हा त्यांचा हातखंडा आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागात सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कारवाईमुळे भेसळबहाद्दरांचे धाबे दणाणले आहेत.
‘मुंडे ब्रँड’ जिवंतपणा: कायद्याच्या चौकटीत थेट कारवाई
IAS तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. कोणतेही सरकार त्यांना जास्त काळ एका पदावर टिकू देत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. परंतु, मुंडे साहेबांनी एकदा का एखाद्या विभागाचा चार्ज घेतला, की त्या विभागात अचानक ‘जिवंतपणा’ येतो. कायद्याच्या चौकटीत राहून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट आणि फिक्स कारवाई होते.
पूर्वी अन्नात काही घाण किंवा भेसळ आढळल्यास तक्रार कुठे करायची, इथपासून सर्वसामान्यांना सुरुवात करावी लागायची. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. भेसळ केली की डिपार्टमेंट दारात हजर होणार, अशी भीती आता चुकीचे काम करणाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. जे नियमांचे पालन करतात, त्यांना कोणताही त्रास नाही; मात्र पॅकेजिंग, लेबलिंग आणि अन्नात भेसळ करणाऱ्यांची मोठी घाबरगुंडी उडाली आहे. आगामी काळात जिल्हानिहाय तक्रार निवारण आणि हेल्पलाईन क्रमांकही जाहीर होण्याची शक्यता आहे.
ताकदवर ‘लॉबी’ सक्रिय; जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन
इतक्या धडाकेबाज कारवाया होत असल्याने आता नेहमीप्रमाणे एक आर्थिकदृष्ट्या ताकदवर ‘लॉबी’ आयएएस तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी पडद्यामागून सक्रिय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही लॉबी राजकारण्यांवर दबाव आणून मुंडे साहेबांची बदली करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणार, यात शंका नाही.
याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील सजग जनता आणि नेटीझन्स मुंडे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी पुढे सरसावले आहेत. “अन्नात माती कालविणाऱ्यांविरोधात प्रामाणिकपणे लढणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होऊ देणार नाही,” असा सूर जनतेतून उमटत आहे. या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी राहण्यासाठी जनतेने आतापासूनच सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून ‘बोलते’ व्हावे, असे आवाहन केले जात आहे.
आता पाहायचे हे आहे की, भ्रष्टाचारी लॉबीच्या दबावासमोर शासन झुकणार की जनतेच्या भावनेचा आदर करत तुकाराम मुंडे यांना अन्न भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी मोकळी सूट मिळणार?

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button