Uncategorized

बीड जिल्ह्यात खोट्या गुन्ह्यांचा सुळसुळाट! चौकशीविना गुन्हे दाखल होण्यामागे राजकीय दबाव की गुन्हेगारांची युती?

बीड पोलिसांचा कारभार रामभरोसे! चौकशीविना थेट गुन्हे दाखल; खाकीवर राजकीय दबाव की गुन्हेगारांची दहशत?

बीड:-गेल्या काही काळापासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या विळख्यात पुरता अडकला असून, महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या आलेखात जिल्हा अव्वल स्थानावर पोहोचल्याचे विदारक चित्र आहे. खून, दरोडे, आणि अपघातासारख्या गंभीर घटना आता बीडकरांसाठी रोजच्याच आणि ‘सर्वसामान्य’ गोष्टी बनल्या आहेत का? असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. त्यातच, योग्य शहानिशा न करता थेट गंभीर गुन्हे दाखल करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे आता खाकीच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चौकशीविना गुन्हे दाखल; सराईत खोटारड्यांचे फावले!
जिल्ह्यात सध्या विनयभंग, बलात्कार, हाफ मर्डर आणि ॲट्रॉसिटीसारखे अतिशय गंभीर गुन्हे कोणतीही ठोस पूर्वचौकशी न करता थेट दाखल केले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. वैयक्तिक हेवेदावे, जमिनीचे वाद किंवा आर्थिक देवाणघेवाणीतून कोणाचा तरी काटा काढण्यासाठी कायद्याचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे. खोटे गुन्हे नोंदवणारे हे टोळके इतके सराईत झाले आहे की, त्यांना कायद्याची किंवा पोलिसांची कोणतीही भीती उरलेली नाही. ‘खऱ्या गुन्हेगाराला अजिबात सोडू नका, पण खोट्या प्रकरणांची चौकशी केल्याशिवाय गुन्हे दाखल का करता?’ असा रोकडा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
राजकीय की गुन्हेगारांचा दबाव? पोलीस प्रशासनाची बदनामी कोणामुळे?
अशा खोट्या गुन्ह्यांमुळे निष्पाप लोक तर भरडले जातातच, पण नंतर जेव्हा सत्य समोर येते तेव्हा पोलीस प्रशासनाचीही संपूर्ण महाराष्ट्रभर मोठी बदनामी होते. मग प्रश्न पडतो की, पोलीस प्रशासन नक्की कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? हा दबाव स्थानिक राजकारण्यांचा आहे की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा?
माजी मंत्री धनंजय मुंडे, धनंजय देशमुख, दादा खिंडकर, सातपुते यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या आणि व्यक्तींच्या नावांभोवती फिरणाऱ्या वैयक्तिक व राजकीय गुन्हेगारी प्रकरणांमुळे बीड जिल्ह्याची नाहक बदनामी संपूर्ण राज्यात होत आहे. जे खरोखर दोषी आहेत, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, राजकीय बळ वापरून खोट्या आणि बनावट केसेस रेटून धरणे हे कितपत योग्य आहे?

नेत्यांना जाहीर इशारा: ‘गैरकारभाराला समाज पाठीशी घालणार नाही’

जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे; तुमच्या पाठीशी जो समाज उभा आहे, तो तुम्ही केलेल्या चांगल्या कामांमुळे आणि चांगल्या कर्मांमुळे आहे. तुमच्या वैयक्तिक वादासाठी किंवा गैरकारभाराला पाठीशी घालण्यासाठी समाज कधीही पुढे येणार नाही, हे ध्यानात घेतलेले बरे.

पोलीस प्रशासनाला जाहीर विनंती आणि बीडकरांचा संताप
बीडच्या सुज्ञ नागरिकांनी आता पोलीस प्रशासनाला थेट विनंती वजा इशारा दिला आहे:
पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय किंवा गुन्हेगारी दबावाखाली न येता, निष्पक्षपातीपणे काम करावे. तक्रार आल्यावर आधी त्याची सखोल चौकशी व्हावी, तरच गुन्हा नोंदवला जावा. तसेच, जे लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात, अशा खोटारड्या लोकांना कायद्याचा असा हिसका दाखवा की, पुन्हा पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे.
बीड जिल्ह्याला गुन्हेगारीच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी आता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची आणि ‘खाकी’चा इंगा दाखवण्याची वेळ आली आहे, अन्यथा जिल्ह्याची शांतता पूर्णपणे धोक्यात येईल हे नक्की.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button