कृषी
शेतकर्यानों उस सोडुन कोणतेही पिक घ्या पन कारखानदाराच्या पुढे नाक घासू नका
सर्व पक्षीय नेते मंडळी शेतकर्यांचे कर्दनकाळ म्हणुनच उगम पावलेले आहेत

केज! आज शेतकरी सोयाबीन कापुस गहु ज्वारी कांदा अश्या शेती मालाला भाव नाही ही वस्तुस्थिती आहे पन गेल्या दोन तीन वर्षात पावसाळा नसल्यामुळे उसाचे प्रमाण कमी झाले होते त्यामुळे चढाओढीने कारखानदाराने उसाला भाव दिला या वर्षी पाऊस जास्त झाला आहे उसाचे क्षेत्र आता वाढणार आहे यांचा फायदा घेऊन हे कारखानदार शेतकर्याची पिळवणुक करणार हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे शेतकर्यानी या नेतेमंडळीच्या दारात नाक रगडण्यापेक्षा सन्मान जनक राहण्यासाठी पैस्या पेक्षा स्व:ताची इज्जत कशी राहील यांची काळजी करावी हा आपला नेता तो आपला विरोधक हे बघण्याचे दिवस राहिलेले नाही विरोधाकांचे उस लवकर घेऊन जात आहेत पन आपल्या कार्यकर्त्याला भिकेला लावली तरी यांना काही फरक पडणार नाही
अभिनंदन अशीच प्रमाणीक कार्यकर्तेची वाट लावावी



