Uncategorized
सोनीजवळा म्हणजे ‘मलबार हिल’ आहे का? टॅक्स न भरता चोवीस तास पाणी हवे असणाऱ्या ‘सत्तापिपासूं’चा पर्दाफाश!
सोनीजवळा गावातील पाणीपुरवठ्यावर राजकारणाचे 'ग्रहण'; कामात अडथळे आणणाऱ्या 'सत्तापिपासूं'चा तहसिल कार्यालयात वावर
केज :- एकीकडे उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि दुसरीकडे गावाच्या विकासासाठी धडपडणारे नेतृत्व, अशा कात्रीत सध्या केज तालुक्यातील सोनीजवळा गाव सापडले आहे. गावाच्या सरपंच सौ. जानवी गोविंद ससाने या पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतानाच, गावातील काही भ्रष्ट आणि सत्तापिपासू प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या कामात खोडा घालण्याचे सत्र सुरू केले आहे. स्वतःचा खिसा भरण्यासाठी आणि राजकारणासाठी चक्क तहसीलवर मोर्चा काढण्यापर्यंत या लोकांची मजल गेल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
सोनीजवळा पाण्याची टाकी ते गाव या दरम्यान असलेली सिमेंटची पाईपलाईन अत्यंत जुनी झाली आहे. या पाईपलाईनमध्ये झाडाची मुळी शिरली तरी पाणी चोकअप होण्याचे प्रकार घडत आहेत. ही तांत्रिक अडचण ओळखून सरपंच ससाने यांनी आज १९ एप्रिल २०२६ रोजी प्रत्यक्ष उपस्थित राहून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. ब्लॉक शोधून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
पाणीपुरवठ्यासाठी नवीन पर्यायी व्यवस्था
गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये म्हणून सरपंचांनी अनेक महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत:
• सावता बाबा मंदिर परिसर: येथे नवीन बोअरवेल घेऊन ती २४ तास सुरू ठेवण्यात आली आहे.
• हनुमान मंदिर परिसर: ग्रामपंचायतीची बोअरवेल सुरू असून ती शेतातील पाईपलाईनला जोडली आहे.
• अंतर्गत पाईपलाईन: लवकरच गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अंतर्गत पाईपलाईनचे नियोजन पूर्ण झाले आहे.
• भवानी नगर: येथेही नवीन पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून लवकरच पुरवठा सुरू होईल.
कर न भरता ‘मलबार हिल’सारख्या सुविधा हव्यात?
सोनीजवळा गावाची लोकसंख्या ४ हजारांच्या आसपास असून ८०% लोक वस्त्यांवर राहतात. धक्कादायक वास्तव हे आहे की, धनेगावच्या १२ गावे पाणीपुरवठा योजनेचा शासकीय महसूल (टॅक्स) कधीच भरला जात नाही. तरीही, पाणीपुरवठा खंडित झाला की लगेच राजकारण सुरू केले जाते
“केज शहरातही उन्हाळ्यात पाणी टंचाई असते, तिथली जनता संयम राखते. मग सोनीजवळा म्हणजे काय मुंबईचे ‘मलबार हिल’ आहे का? जिथे टॅक्स न भरता ‘झेड’ दर्जाच्या सुविधा आणि चोवीस तास पाणी हवे असते?” असा जळजळीत सवाल आता सुज्ञ नागरिक विचारत आहेत.
सरपंचांना अडचणीत आणण्याचे ‘भ्रष्ट’ कारस्थान
सरपंच जानवी ससाने या विकासकामे करत असताना, गावातील भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांनी त्यांना जागोजागी अडचणीत आणण्याचे काम सुरू केले आहे. केवळ राजकीय द्वेषापोटी तहसीलवर मोर्चा काढून प्रशासनाची दिशाभूल करण्याचे काम हे गट करत आहेत.
सरपंचांचे आवाहन:
“उन्हाळा कडक आहे, उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळावा. भवानी वस्तीवरील नागरिकांनी बोअरवेलची काळजी घेऊन पाणी जपून वापरावे. आम्ही काम करण्यास कटिबद्ध आहोत, मात्र राजकारण करणाऱ्यांनी विकासात अडथळा आणू नये.”



