सामाजिक

उतरेश्वर पिंपरी येथील महाशिवरात्री निमित्त जय्यत तयारी

पोलीस प्रशासनाची गुन्हेगारावर करडी नजर

 

केज:- श्री क्षेत्र उत्तरेश्वर (हनुमंत) पिंपरी ता.केज, जि.बीड या ठिकाणी १४ वर्षाच्या वनवास काळात प्रभुराम चंद्राने स्थापन केलेले पुरातन शिवलिंग असून या ठिकाणी जटायुपक्षाची उत्तर क्रिया करतांना स्थापन केलेले शिवलिंग असल्यामुळे उत्तरेश्वर असे नामकरण झालेले आहे अशा प्रकारची अख्यायिका आहे. शिवलिंगाच्या उजव्या बाजुस एक आड (विहीर) असुन या आडात पूर्वी दरवर्षी महाशिवरात्री पर्व काळामध्ये काशीतीर्थ म्हणजे श्वेत जल यायचे असेही पूर्वजाकडून ऐकीवात आहे. श्री उत्तरेश्वर महादेव शिवलिंग हे जागृत देवस्थान असुन त्याची परिचिती अनेक भक्ताकडून प्रत्यक्ष अनुभवात असुन या मंदिरात आजही अध्यात्मिक पावित्र्य राखणेसाठी मंदिरातील गाभाऱ्यात मक्तांना ओल्या कपड्यानेच जावे लागते तसेच ३६५ दिवस २४ तास तुपाचा नंदादिवा, दररोज दोन वेळ पुजा, सायंकाळी आरती केली जाते, विना प्रहर देखील आजतागायत चालु आहे. दर महिन्याच्या अमावासेला यात्रा भरत असून सायंकाळी बारा जोतीलिंगाची आरती होऊन किर्तन व भजनादी कार्यक्रम होत्तात या दिवशी हाजारो भाविक दर्शनासाठी येत असतात

विसाव्या शतकातील महान संत कै.ह.भ.प. गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर माऊली (दादा) उत्तरेश्वर पिंपरीकर यांनी देखील याच शिवलिंगाची नित्यनेमाने पुजा, आराधना, ध्यान, उपासनेबरोबरच विविध अध्यात्मिक उपक्रम राबवून मंदिर जिर्णोध्दार, प्रचार, प्रसार केला होता. ग्रामीण भागातील अध्यात्मिक समाधानाचे बीड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाडयातील एकमेव ठिकाण आहे.

या पावन पवित्र ठिकाणी माघ महिन्यात महाशिवरात्री पर्वकाळावर ५ दिवस मोठ्या प्रमाणात यात्रोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा होत असतो, महाशिवरात्री पर्वकाळ असून यात्रेनिमीत्त सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यामध्ये संपूर्ण मंदिरास आतून बाहेरून मंदिर ट्रस्टीकडून रंगकाम करण्यात आले असून संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई, भाविक भक्तांना दर्शन रांगेत उनाचा त्रास होऊ नये म्हणून भव्य मंडप उभारुन त्या मंडप्ातच दर्शन रांगेची व्यवस्था, पालखी मंडप, संपकांसाठी मंदरासमोर पालखी सोहळा व संपर्क मंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे.

ग्रामपंचायतचे सरपंच श्री सचिन अशोकराव चंदनशिव, सोसायटीचे चेअरमन श्री महेश लक्ष्मणराव चंदनशिव व त्यांचे सदस्य सहकारी यांनी गावातील सर्व पथदिवे नवीन बसवून लाईटची चोख व्यवस्था केलेली आहे. तसेच आमदार फंडातून अंडर ग्राऊंड नाल्या करुन पक्के सिमेंट रस्ते व भाविक भक्तांसाठी विविध ठिकाणी पाण्याची व्यवस्था, यात्रेचे स्वरूप मोठे असल्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये सर्व व्यवस्थित पार पाडण्यासाठी ग्राम पंचायत मार्फत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

महाशिवरात्री पर्वकाळाची सुरुवात दि.२६/०२/२०२२ रोजी रात्री ०२ वाजेपासून ग्रामस्थ, बीड जिल्यासह मराठवाडयातील विवध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर आलेले भाविक शिवलिंगाला अभिषेक करून आपली कनोकामना पूर्ण करतात. यात्रोत्सवातील मुख्य गाभा किवा आकर्षण म्हणजे महाशिवरात्री पर्वकाळावर निधणारी श्री उत्तरेश्वर बाबांचा पालखी सोहळा, त्याची सुरुवात सायं ९ ते ११.३० हरिकिर्तनापासून होते त्यामध्ये महादेवाची महती गायली जाते व नंतर १२ ते सकाळी ६ वाजे पर्यंत श्री उत्तरेश्वर बाबांचा पालखी सोहळा सुरु होतो. सदर सोहळ्यात निमीत्त विविध परिसरातुन दिंड्या येतात, पालखी समोर गावातील भजनी मंडळासह सदर दिंड्यांचा भारुड, अभंग, पावले, फुगडी, विविध अध्यात्मिक कला अविष्कार साजरा होतो. पालखी समोर तुपाचे दिप प्रज्वलीत केले जातात तसेच फटाक्यांची अतिशबाजी करुन पालखीची शोभा वाढवली जाते. असे विविध कार्यक्रम साजरे होत असून पालखी दर्शन व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भावीक उपस्थित राहतात. या पर्वकाळामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व विविध ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केले जातात.

यात्रेनिमीत्त विविध प्रकारचे व्यापारी त्यात खेळणी, भांडयाचे, कपड्यांचे स्टॉल, हॉटेल्स, खानावळी, रसवंती, बुरुडाची दुकाने, फैन्सी वस्तुंचे स्टॉल हजेरी लावतात, त्सेच तरुण वर्गसिंह लहान बालकांना मौज-मजा करणे साठी आकाशाला भिडणारे रहाटपाळणे, मौतका कुर्यों, सर्कस, रेल्वे लहान मोठे विविध प्रकारचे या वर्गाती सर्व खेळ साहित्या बरोबरच भेळ, ज्यूस, विविध प्रकारचे कोल्ड्रींक्सचे अनेक स्टॉल या ठिकाणी दरवर्षी आपली हजेरी लावतात त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण वर्गासह लहान मुला-बाळांना या ठिकाणी आनंदाची पर्वणीच असते. ग्रामीण भागातील तरुण वर्गासह सर्व शेतकरी वर्गासाठी वर्षभर काम केलेला शिण घालवण्यासाठी या ठिकाणी अनेक तमाशा मंडळे परस्पर येवून ग्रामीण भागातील शेतकन्यांचे मनोरंजन करतात.

ग्राम पंचायत मार्फत या सर्वांना जागा, पाणी तसेच विविध प्रकारच्या आवश्यक सोई सुविधा पुरवल्या जातात. तसेच पोलिस प्रशासनाद्वारे कडक बंदोबस्त केला जातो.

संपादक विनोद शिंदे

क्रांतीसुर्य न्युज मधे आपले स्वागत आहे सर्व वाचकांना विश्वसनीय बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मताशी संपादक सहमत आसेल असे नाही जर कोणताही वाद विवाद उत्पन्न झाला तर तो सक्षम न्यायालय अंतर्गत आसेल आपणही आपल्या परीसरातील बातम्यासाठी ९९२२२६८३७७ या व्हॉटसएप वर संपर्क साधा जाहीराती साठी किंवा बातमी देण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी अजिबात संपर्क करु नका जर संपर्क केला तर कायदेशीर पने गुन्हा दाखल केला जाईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button