संपादकीय
केज शहरातील भवानी चौकालगतच स्मशानभूमी मंजूर करावी अपघातात मुत्यूमूखी पडलेल्या दु:खी नातेवाईकाची मागणी
या चौकात अतिक्रमण दुर करताना जर कुनी विरोध केला तर मुत्यूमुखी पडलेल्या कुटूंबाचे कसे हाल झाले ते बघा

केज:- केज शहरातील भवानी चौक बनला मुत्यूचा सापळा या मधे अयोग्य रस्ते बांधणी आणि उतार
हा चौक अशा ठिकाणी आहे जिथे हायवेचा मोठा उतार येऊन मिळतो. विशेषतः धारूर बाजूकडून येणाऱ्या जड वाहनांना या उतारावर वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. तांत्रिक भाषेत सांगायचे तर, रस्त्याचा ‘ग्रेडियंट’ (उतार) वाहनांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहे.
२. जड वाहतुकीचा प्रचंड ताण
लातूर-बीड-पुणे-मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने इथून रात्रंदिवस साखर कारखान्यांचे टॅक्टर,ट्रक, आणि अवजड वाहनांची वर्दळ असते. चौकाची क्षमता या वाढत्या वाहतुकीला पेलण्याइतकी नाही.
३. ‘ब्रेक फेल’ होण्याच्या घटना
उतारावर सतत ब्रेकचा वापर करावा लागल्याने मोठ्या ट्रक किंवा टॅक्टर ब्रेक निकामी होण्याचे प्रमाण येथे जास्त आहे. एकदा का ब्रेक फेल झाल्याने उसाच्या टॅक पलटी होऊन पाच ते सहा जनाच्या बळी गेला या उतारामुळे वाहन थेट चौकातील पेट्रोल पंपात शिरते.
४. नियोजनाचा अभाव आणि अतिक्रमणे
• अतिक्रमणे: चौकाच्या कडेला असलेली दुकाने आणि थांबलेली वाहने यामुळे रस्ता अरुंद होतो.
• गतिरोधकांचा अभाव: वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक असलेले शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक किंवा ‘रंबल स्ट्रिप्स’ बसवलेली नाहीत.
५. तांत्रिक त्रुटी
प्रशासकीय भाषेत याला ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, रस्त्याच्या वळणावर किंवा रचनेतच अशा काही त्रुटी आहेत ज्या चालकाला गोंधळात टाकतात किंवा अपघाताला निमंत्रण देतात
आप्पा (तहसिल कार्यालय काम करणारे ) हजारे,मिना शिंदे जुबेर (धंदा) शेख,नसिर कुरेशीचा मुलगा अजून बरीच नावे या चौकात मुत्यूमुखी पडले आहेत मग यामधे रस्ते वाहतूक प्रशासन किंवा नगरपंचायत प्रशासन हा चौकातील अतिक्रमण किंवा धारुर कडून येणारे वाहनधारकांना दिसेल अशी व्यवस्था का करत नसेल याला विरोध कुनिही केलेला नाही फक्त भवानी चौक आहे म्हणून प्रशासन हात लावत नसेल तर तेथेच एखादी स्मशान भूमीची मंजूरी आणून अपघातात मृत्यू झाल्याचं कळाले की अंत्यविधी उरकायला सोपे होईल



