सामाजिक
खा.रजनीताई पाटील यांच्या मागणीला यश मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला…
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय...

अभिजात दर्जा मिळणे म्हणजे काय?
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ साली अभिजात दर्जा प्रदान करण्यात आला. त्यापाठोपाठ संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.



